Friday, June 24, 2011

हॅन्डल लॉक (23 June 2011)

हॅन्डल लॉक

उद्या माझे आईवडील येणार होते. ते येणार म्हणजे मीच त्यांना बोलावून घेतले होते. कारण ई.एस.आय.सी. चे कार्ड काढण्यासाठी आपल्या आईवडीलांना नेणे आवश्यक असते. जर आपल्या सोबत त्यांना सुध्दा ई.एस.आय.सी. ची सुविधा हवी असेल तरच नेणे गरजेचे असते. त्यामुळे मी त्यांना उद्याच बोलावून घेतले होते.
आज माझ्या ऑफिसचा टाईमिंग सुध्दा संध्याकाळी ५ ते रात्री १ असा असल्यामुळे मी दिवसभर घरीच होतो. इथे माझा एक अभिषेक नावाचा मित्र आहे. तो १२ वी ला आहे. तो दिवसभर घरीच असतो (कॉलेज आणि क्लासचा वेळ सोडून). मी त्याच्या रुमवर जाऊन बसलो. माझी रात्रपाळी होती त्यामुळे मी त्याला सागरची गाडी घेऊन मला घ्यायला येतो का? विचारले. तो मला हो म्हणाला. त्यामुळे माझा मध्यरात्री पुण्यात फिरण्याची अडचण दूर झाली होती. नंतर मला मेसला जेवायला जायचे होते म्हणून निघालो. आज रात्र पाळी असल्याने मी मेसला दूपारी जाणार होतो. मेसला गेल्यावर कानावर आलं की, आज कोणाची तरी दूचाकी गाडी चोरीला गेली म्हणून. त्यामुळे तेथील सर्व बायकांचा विषय हाच होता. या विषयाच्या गप्पांची मजा घेत घेत मी माझे जेवण संपवले.
उद्या आई वडील येणार असल्यामुळे मी आजच ई.एस.आय.सी. चे ऑफिस शोधून काढले. उगाच त्यांना घेऊन शोधायचे काम नको. आमच्या ऑफिसमधून पत्ता घेतला. स्वारगेटजवळ ते ऑफिस असल्याचे कळाले. मी स्वारगेट येथील त्या ऑफिसमध्ये जाऊन सगळी माहिती घेतली आणि घराकडे निघालो. दुपारचे जेवण झाले असल्याने खूप झोप येत होती. रुमवर येऊन झोपलो. झोप लागती न लागती तोच दू ३. वा माझ्या एका मैत्रीणीचा फोन आला. आश्विनी तीचे नाव. ती फोनवर बोलू लागली. खुप वेळ झालं फोनवर आम्ही बोलत होतो. झोप तशी निघून गेली होती आणि मला ४. वा ऑफिसला जायचे होतेच. तीने फोन करण्याचे कारण सांगितले की, तीची एक मैत्रीण पुण्यातच असते, तीचे एम.एस्सी. मास कम्यूनिकेशन झाले होते. आता ब्लॉक प्लेसमेंटसाठी ती आमच्या सकाळ पेपर्स मध्ये ब्लॉक प्लेसमेंट अथवा ट्रेनिंगची सुविधा आहे का? हे विचारण्यासाठी तिने फोन केला होता. मी विचारुन पहातो म्हणून सांगितल्यावर तीने तिच्या मैत्रिणीला मला फोन करायला सांगितला. तिच्या मैत्रीणीचा सुध्दा फोन आला. तीला मी ऑफिसकडे भेटायला बोलावले. मी तीचा रिस्यूमे घेतला आणि तीला नंतर कळवतो म्हणून सांगितले. मला पहिले आमच्या सरांना विचारायचे होते. त्यामुळे मी तीला तसेच सांगितले.
आज रात्रपाळी असल्याने माझे रात्रीच्या जेवणाची गोची होणार होती. परंतु बरं झालं तेथे एक खानावळ असल्याने माझी जेवणाची सुध्दा अडचण सुध्दा दूर झाली. माझी रात्रपाळी संपण्या आगोदरच अभिषेकचे दोन फोन येऊन गेले होते. त्याला मी निघाल्यावर फोन करतो म्हणून सांगितले. नंतर मी त्याला निघण्यास सांगितले. तो येऊन ए.बी.सी. चौकात थांबला. मला थोडा उशीर झाला. तो पर्यंत तो तिथेच थांबला होता. मग मी पटकन जाऊन त्याला भेटलो. नंतर गाडीवर आम्ही घरी आलो. घरी आल्यावर गाडी लॉक केली नंतर अभिषेक हॅन्डल लॉक करायला लागला. पण हॅन्डल लॉक कुठे होतोय. हॅन्डल उजवीकडे फिरव, डावीकडे फिरव पण काही केल्या हॅन्डल लॉक व्हायला तयार नाही. नंतर मी सुध्दा बरेच प्रयत्न केले. पण मी सुध्दा अयशस्वीच ठरलो. मला अजून टेन्शन यायला लागले. सकाळीच गाड्याचोरींचे कानावर आले आणि आज मला आणायला अभिषेक सागरची गाडी घेऊन आला होता त्यामुळे मला जरा जास्तच टेन्शन होतं. नंतर आम्ही विनाहॅन्डल लॉक करुनच निघायचे ठरवले पण माझे मन घाबरत होते मग अभिषेकने एक युक्ती केली आणि गाडीचा प्लगच काढून घेतला आणि म्हणाला, ''आता कोणाच्या बापाकडून ही गाडी चालू होणार नाही, फक्त कोणी मॅकेनिकल इंजिनिअर सोडून!''. मग हसत हसत आम्ही रुमकडे झोपायला निघालो. तरीही मन थोडं फार शंकीतच होतं गाडी बाबत. कशी-बशी झोप लागली. सकाळी ६ वा. जाग आली. आईवडील आळंदीला आले होते आणि तेथून ते पूण्यात येणार होते. मी सकाळी लवकरच आवरुन घेतले. तोपर्यंत सागर उठला नव्हता. माझे आवरण्याच्या आधीच मी सागरच्या गाडीची पहाणी केली होती तर ती आहे त्या जागीच उभी होती त्यामुळे माझ्या टेन्शनला आता विराम मिळाला होता. नंतर थोड्या वेळाने सागर सुध्दा उठला. मी त्याला कालरात्रीची हकीकत सांगितली तेव्हा तो म्हणला की माझ्या गाडीचा ''हॅन्डल लॉकच होत नाही''..नंतर पुन्हा आम्ही हसू लागलो... हा..हा..हा..:-)

No comments:

Post a Comment